संस्थानाची ऊद्धीष्ट
1. सामाजिक ,शैक्षणिक, कला , क्रीडा , संस्कृती यांचे जतन व संवर्धन करणे .
2. श्री क्षेत्र जोतिबा येथे येणाऱ्या भाविकांना सोयी – सुविधा मिळण्यासाठी कार्य करणे.
3. आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये मदत कार्य करून सामाजिक हित जपणे.
4. ग्रामीण भागातील आरोग्य विषयक सुविधांसाठी कार्य करणे.
5. भक्तगण आणि समाजासाठी सदैव तत्पर.
6. आम्ही भाविक आणि समाजाच्या कामी.
7. ध्यास भाविकांच्या सुख सुविधांचा, समाजाच्या हिताचा.
|| अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत दख्खनचा राजा ||
|| बोला दख्खनच्या राजाचं चांगभलं ||

समाज सेवा
येथे दिवाळी सणानिमित्त सर्वा वडीलधाऱ्याना ब्लँकेट सहित दिवाळी साहित्य वाटप . (दि. २१/10/२०२२ )
येथील विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. (दि. ०९/०१ /२०२३ )
डोंगर येथील इयत्ता १० च्या सर्वे गरजू विधायर्थ्याना परीक्षेचे सर्व साहित्य वाटप. (दि.२७/०२/२०२४ )

नित्य पूजा विधी
पहाटे ४:०० वाजता
घंटानादाने मंदिर उघडते
पहाटे ५:०० वाजता
पाद्यपूजा व काकडआरती
सकाळी ८:०० वाजता
पंचामृत अभिषेक
सकाळी ९:०० वाजता
सुवर्ण अलंकार अर्पण करून महापूजा ( खडीपूजा )
सकाळी ९:३० वाजता
.
धुपारती व महानैवेद्य
दुपारी ३:०० वाजता
स्नान अभिषेक व बैठी पूजा
सायं ७:०० ते ९:०० वाजता
धुपारती व शेजारती, विरागी / साधी पूजा
रात्री ११:०० वाजता
मंदिर बंद केले जाते
जोतिबा मंदिर
समुद्रसपाटीपासून सुमारे ३१०० फूट उंचीवरील या ज्योतिबा डोंगराचा परिसर हा निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या वैभवात तसेच भोतिक व ऐहिक ऐश्वर्यात मोलाची भर घालणाऱ्या या तीर्थक्षेत्रीय परिसराचा सर्वागीण विकास करण्याची योजना कार्यान्वित झाली आहे. वाडी रत्नागिरी या नावाने परिचित असलेले जोतिबा देवस्थान हे कोल्हापूरच्या वायव्येस साडेसतरा कि. मी. वर आहे.
सह्याद्रीचा जो फाटा पन्हाळगड, पावनगड असा गेला आहे. त्याच्यापुढे सोंडेसारखा शंखाकृती भाग जो वर गेलेला दिसतो, तोच ज्योतिबाचा डोंगर ! या डोंगरावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले हे ज्योतिबाचे पुरातन मंदिर आहे.
पहाटे येथील वातावरण खुप प्रसन्न असते.
जोतिबावर सरता रविवार, लळित सोहळा, नगरप्रदक्षिणा, अकरा मारुती दिंडी, नवरात्रोत्सव, पालखी सोहळे, श्रावण षष्ठी यात्रा असे अनेक सण-उत्सव साजरे केले जातात. जोतिबाचे मंदिर हे ठरावीक दिवसांसाठीच रात्रंदिवस खुले असते. चैत्र यात्राकाळात तीन दिवस, श्रावण षष्ठी यात्रेत, चैत्र षष्ठीस, लळित सोहळ्यास, विजयादशमीचा जागर या दिवशी ते रात्रंदिवस खुले असते.
दक्षिण काशी म्हणून भारतभर ख्यातकिर्त असलेल्या करवीरपीठास धर्म शास्त्रात अनन्य साधारण महत्त्व आहे.दख्खनचा राजा श्री.जोतिबा श्री जोतिबा ,श्री कात्यायनी देवी ,नृसिंहवाडी येथील श्रीक्षेत्र दत्तात्रय मंदीर, बाहुबली येथील जैन धर्मियांचे पवित्र क्षेत्र त्याचप्रमाणे विशाळगड आदि धर्मस्थळांमुळे कोल्हापूरचा लौकिक त्रिखंडात झाला आहे.त्यामुळे कोल्हापूरास अलौकिक स्थान महात्म्य प्राप्त झाले आहे.या धर्मस्थळांपैकी वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबा देवस्थान महाराष्ट्राचे लोकदैवत म्हणून प्रसिद्ध आहे.समुद्रसपाटीपासुन सुमारे ३१०० फूट उंचीवरील या जोतिबा डोंगराचा परिसर हा निसर्गसौंदर्याने नटलेला आहे.कोल्हापूर जिल्ह्याच्या वैभवात तसेच भौतिक व एतहासिक एश्वर्यात मोलाची भर घालणाऱ्या या तीर्थक्षेत्रीय परिसराचा सर्वांगीण विकास करण्याची योजना कार्यान्वित झाली आ स्थान माहात्म्य व पूर्वपीठिका . डोंगरावरील उंच-सखल भागात वाडी रत्नागिरीचे गावठाण वसले असून , सुमारे ५ हजार लोकवस्तीच्या या गावात ९९ लोक गुरव समाजाचे आहे.देवताकृत्य तसेच नारळ,गुलाल व मेवामिठाई दुकाने यावरच त्यांची गुजराण होते.
वाडी रत्नागिरी या नावाने परिचित असलेले जोतिबा देवस्थान हे कोल्हापूरच्या वायव्येस साडेसतरा कि.मी.वर आहे.सह्याद्रीचा जो फाटा पन्हाळगड, पावनगड असा गेला आहे.त्याच्यापुढे सोंडेसारखा शंखाकृती भाग जो वर गेलेला दिसतो,तोच जोतिबाचा डोंगर या डोंगरावर प्राचीन काळापूसन प्रसिद्ध असलेले हे जोतिबाचे पुरातन मंदिर आहे.
श्री ज्योतिबा अथवा केदारेश्वर हे बद्रिकेदारचेचे रूप आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी या सर्वाचा मिळून एक तेजःपुंज अवतार म्हणजेच ज्योतिबा किंवा केदारनाथ ! ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली असून ज्योत म्हणजे तेज, प्रकाश ! वायू, तेज, आप (पाणी) आकाश व पृथ्वी या पंचमहाभूतांपैकी तेजाचे शक्तीदैवत म्हणजेच वाडी रत्नगिरीचा ज्योतिबा ! पौगंड ऋषीच्या वंशाला दिवा नव्हता.त्यांनी तपश्चर्या करून ब्रदिनाथांना संतुष्ट केले.ब्रदिनाथांनी ऋषी व त्यांची पत्नी विमलांबुजा यांच्या पोटी जन्माला येण्याचे वचन दिले त्याप्रमाणे चैत्र शुद्ध पष्ठीच्या मुहूर्तावर स्वता आठ वर्षांची बालमुर्ती होऊन ब्रदिनाथ हे ऋषी दांपत्यासमोर अवतरले ही बालमुर्ती ब्रदिनाथांची प्राणज्योती । म्हणून त्यांचे नाव जोतिबा असे ठेवले.आपला पुत्र हा जगाचा तारणकर्ता व गरिबांचा कैवारी असावा अशी विमलांबुजाची तीव्र इच्छा होती,त्याप्रमाणे तिच्या ओंजळीत केदारनाथांची प्राणज्योत प्रकट झाली,तेच जोतिबाचे रूप होय.श्री जोतिबाला गुलाल,दवणा,खोबरे व खारका प्रिय। त्याच्या दवण्याला गंध हा सत्त्व,रज,तम गुणयुक्त आहे.
रत्नासुर व कोल्हासुर या राक्षसांनी अत्याचार सुरू केला होता. तेव्हा करवीर निवासनी श्री महालक्ष्मीने केदारनाथांचा (जोतिबा) धावा केला. तेव्हा जोतिबा देवाने राक्षसांचा संहार केला. हे राक्षस मारल्यानंतर श्री महालक्ष्मी देवीचा राज्याभिषेक केदारनाथांनी केला व ते परत हिमालयाकडे जाण्यास निघाले, तेव्हा महालक्ष्मी व चोपडाई देवीने त्यांना वाडी रत्नागिरीवर परत आणले व त्यांचा राज्याभिषेक केला. सोहळ्यास यमाई देवीस निमंत्रण देण्याचे विसरल्याने त्या रुसल्या. त्यांचा रुसवा काढण्यासाठी पूर्वी केदारनाथ औंध गावी जात होते. त्यावेळी यमाई देवीने केदारनाथांना सांगितले की तुम्ही आता मूळ पीठाकडे येऊ नका, मीच वाडी रत्नागिरीवरील चाफेबनात येते. तेव्हापासून केदारनाथ चैत्र पौर्णिमेस श्री यमाई देवीची भेट घेण्यासाठी सासनकाठी लवाजम्यासह जातात. हीच चैत्र यात्रा होय.
चैत्र यात्रेत गुलाल-खोबरे, बंदी नाणी यांची पालखीवर होणारी उधळण अनोखी असते. . सासनकाठ्या चाळीस फूट उंचीच्या असतात. रंगीबेरंगी कपड्यांनी सजविलेल्या सासनकाठ्या आकर्षक व सुंदर दिसतात. काही काठ्यांना नोटांच्या माळा, फुलांच्या माळा असतात. हलगी, पिपाणी, तुतारी, सनईच्या तालावर काठ्या विशिष्ट पद्धतीने नाचविल्या जातात. भर उन्हात तरुण वर्ग, गुलालात चिंब होऊन नाचतो. सर्वांच्या मुखात जोतिबाच्या नावानं चांगभलचा अखंड गजर असतो.
हस्त नक्षत्रावर दुपारी दीड वाजता सासनकाठीच्या मिरवणुकीस प्रारंभ होतो,त्यावेळेस देवस्थान कमिटीचे भालदार चोपदार पालक मंत्री , तीर्थक्षेत्र पाडळी (निनाम)सासन काठी १ चे पूजन करून संत नावजीनाथच्या किवळ काठीस पानाचा विडा देऊन आमंत्रण् देतात आणि तोफेच्या सलामीने मिरवणुकीस प्रारंभ होतो. या मिरवणुकीमध्ये क्रमवारे पहिला मान तीर्थक्षेत्र पाडळी (निनाम ) ता. जि .सातारा )या सासनकाठीचा,त्यानंतर मौजे विहे (ता.पाटण), करवीर कोल्हापूरची हिंमत बहादूर चव्हाण, वाळवा तालुक्यातील करंजवडे’ ता.वाळवा जि.सांगली गावातून येणारी मध्यप्रदेश येथील ग्वाल्हेरच्या शिंदे उर्फ सिंधिया सरकार, कोल्हापूर छत्रपती, कसबा डिग्रज (ता.मिरज), कसबा सांगाव (ता.कागल), किवळ (जि. सातारा), कवठेएकंद (जि. सांगली), रेठरे बुद्रुक साळुंखे (ता.कराड) यांच्या मानाच्या १८ सासनकाठ्या सहभागी होतात. मान नसलेल्या ५७ आणि इतर २९ अशा एकूण ९६ सासनकाठ्या सहभागी असतात. या मिरवणुकीमध्ये २० फुटांपासून ते ७० ते ८० फुटांच्या उंचच उंच सासनकाठ्या सहभागी असतात. हस्त नक्षत्रावर दुपारी दीड वाजता सासनकाठ्यांच्या मिरवणुकीस प्रारंभ होतो. यावेळी तोफेच्या सलामीने जोतिबा मंदिरातून यमाई मंदिराकडे पालखी मार्गस्थ होते.फक्त संत नावजीनाथ किवळ (जि. सातारा) याच सासनकाठीला यमाई मंदिराच्या दारात उभे राहण्याचा मान आहे.सायंकाळी साडेसहा वाजता यमाई मंदिरात यमाईदेवी व जमदग्नी यांच्या विवाह सोहळ्याचा धार्मिक विधी होतो. त्यानंतर ‘श्रीं’ची पालखी व संत नावजीनाथांची सासन काठी परत श्री जोतिबा मंदिरात येऊन तोफेच्या सलामीने रात्री दहा वाजता पालखी सोहळ्याची सांगता होते.
यावर्षीचे जोतिबा उत्सव
मुख्य उत्सव - चैत्र यात्रादि.
दि. २३ एप्रिल २०२४
पायी खेटे
दि. २५ फेब्रुवारी २०२४
श्रावण षष्ठी
दि. १० ऑगस्ट २०२४
नगरप्रदक्षिणा (श्रावणातील ३ सोमवार)
दि. १९ ऑगस्ट २०२४
जोतिबा नवरात्रोत्सव
दि. ३ ऑक्टोबर २०२४
।। श्री जोतिबा आरती ।।
भगीरथी तूही हिमाचल वाशी । नलगत पलखल दुर्जन संहारी त्याशी ।
तो हा हिम केदार करवीरा पाशी । रत्नागिरीवर शोभे कैवल्य राशी ।
जयदेव जयदेव जय जय श्री केदार । दासा संकटवारा भव भय निवारा ।।१।।
उत्तरेचा देव दक्षिणी आला । दक्षिण केदार नाम पावला ।
रत्नासूर मर्दूनी भक्ता पावला । दास म्हणे थोर भाग्या लाभला ।
जयदेव जयदेव जय जय श्री केदार । दासा संकटवारा भव भय निवारा ।।२।।